राज्यात चोवीस तासात ८,१४२ करोनाबाधितांची नोंद झाली असून १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर २३,३७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात आज 8142 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 23371 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 1415679 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 158852 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.51% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) October 21, 2020
गेल्या चोवीस तासातील नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या १६,१७,६५८ वर पोहोचली असून आजवर ४२,६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण १४,१५,६७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दरम्यान राज्यात अद्याप १,५८,८५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचबरोबर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८७.५१ टक्के झाले आहे.
Mumbai reported 1,609 new coronavirus case and 48 deaths today, taking total cases to 2,45,871 including 2,15,269 recoveries and 9,869 deaths. Number of active cases in the city stands at 19,245: Brihanmumbai Municipal Corporation, Maharashtra pic.twitter.com/XxmvsXwK8Q
— ANI (@ANI) October 21, 2020
दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात १,६०९ रुग्ण आढळून आले. तर ४८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील एकूण २,४५,८७१ रुग्णांपैकी २,१५,२६९ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात आता १९,२४५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर ९,८६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 10:25 pm