कर्जमाफीचा लाभ, बोंडआळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शासनाकडून घोषणा झाली असली तरीही त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यातच आवकाळी पाऊव व गारपीटीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याचे कंबरडे मोडून गेले होते. घेतलेले कर्ज कसे फेडावे या काळजीने शेतकरी आत्महत्येचा मार्ग पतकारने भाग पडले होते. मराठवाड्यात वर्षभरात तब्बल ९४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीचे उत्पादन घटले आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत भर पडली. अशा नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज होती. पण सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने न घेतल्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत गेल्या. २०१७ या वर्षात मराठवाडा विभागात ९९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची महसूल प्रशासनाकडे नोंद आहे. त्याच प्रमाणे गेल्या वर्षातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही,  सरकारने केलेल्या कर्जमाफी योजना फसवी निघाली त्याचा लाभ मिळण्यास झालेला विलंब त्याचबरोबर बोंडआळीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मदत देण्याकडे शासनाने केलेली दिरंगाई आणि कमी पावसामुळे घेतलेल्या पिक हातातून गेल्यामुळे आत्महत्येच्या घटना वाढण्यास कारणीभूत ठरल्या.

१ जानेवारी ते ३० डिसेंबर २०१८ कालावधीत मराठवाड्यात तब्बल ९४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, यातील ६०३ शेतकरी कुटुंबांना सरकारी मदत मिळाली. त्यातील ८० प्रकरणे अपात्र ठरवली, तर आतापर्यंत २६४ प्रकरणांची चौकशी अद्यापही शासन दरबारी सुरू असल्यामुळे प्रलंबित आहेत. काही प्रकरणांमध्ये शवविच्छेदन अहवाल समितीला प्राप्त झाला नाही. काही शेतकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्रे पूर्ण नसल्याने त्यांचे वारस मदतीपासून वंचित राहिले आहेत. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या बीड १९७,औरंगाबाद १४९, उस्मानाबाद १४० जिल्ह्यात झाल्या आहे.

जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्या

औरंगाबाद     १४९

जालना          ८३

परभणी         १२९

हिंगोली          ६४

नांदेड             ९८

बीड                १९७

लातूर              ८७

उस्मानाबाद     १४०

———————————

एकूण             ९४७