केवळ निवडणुकीसाठी आम आदमी पक्षात आलेले कार्यकर्ते पक्षाच्या नावाचा गैरवापर करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्र व हरियानातील निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. केवळ निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्याचा अनुभव नसलेल्या कार्यकर्त्यांकडून संभ्रम पसरविले जात असल्याची माहिती सुभाष लोमटे यांनी दिली.
राज्यातील निवडणुकांमध्ये सहभागी व्हावे, असे प्रयत्न आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झाले. मयांक गांधी व अंजली दमानिया यांच्या भावनाही पक्षाने जाणून घेतल्या. मात्र, निवडणुका न लढविण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला. तो निर्णय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही मान्य केला. परंतु काही कार्यकर्ते जाणूनबुजून पक्षविरोधी काम करीत आहेत. ते अफवा पसरवत आहे. त्याकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन सुभाष लोमटे व मनीषा चौधरी यांनी केले आहे.