पुणे-बंगळुरू महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात येणारी कार रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकला जोरात आदळून हा भीषण अपघात झाला. अपघात इतका जबरदस्त होता की कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचालक ओंकार पोळ याच्यासह अरुणा भोसले, उज्वला सणस आणि अश्विनी असवले यांचा मृत्यू झाला आहे. राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खेड शिवापूर टोलनाक्यावर आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याकडे चारचाकी वाहनातून जाताना कारचालक ओंकार पोळ याचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये चारचाकी वाहनातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे'.