मुंबईतील समतानगर भागातून निघालेली साइराम पालखी शिर्डीकडे पायी जात असताना या पालखीला सिन्नर शिर्डी रस्त्यावरच्या देवापूर फाट्याजवळ अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना खासगी वाहनाने शिर्डीत आणले गेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत अशीही माहिती मिळते आहे. अविनाश अशोक पवार (३०), अनिकेत दिपक मेेहेत्रे (१८) या दोघांचा मृ्त्यु झाला आहे.

मुंबईतील समतानगर भागात राहाणारे हे साइभक्त असून ते पायी शिर्डीला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जी मदत पोहाचायला हवी त्यास उशीर झाल्याने साइभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.