दूधगंगा नदीतून इचलकरंजी शहरास पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या  योजनेला कागलवासियांचा विरोध आहे. त्यासाठी लढा देऊ प्रसंगी रक्त सांडू, असा इशारा शनिवारी देण्यात आला.इचलकरंजीच्या पाणी योजनेला विरोध करण्यासाठी शेतकरी व नागरिकांच्यावतीने दूधगंगा नदी पात्रात कागल तालुक्यातील भाजप ग्रामीण जिल्हा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी दुधगंगा नदीवर धरणे आंदोलन केले.

यावेळी येवली शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने बोलत होते. पाणी योजनेस तीव्र विरोध दर्शविणारे फलक घेतलेल्या कार्यकर्त्यांनी विरोधाच्या घोषणा दिल्या.  बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाबगोंडा पाटील यांनी पाणी पिण्यासाठी राखीव असणारे, पाणी शिल्लकच नसल्याने इचलकरंजीला पाणी कोठून द्यावयचे? असा प्रश्न उपस्थित केला.

Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?
lok sabha elections 2024 bjp focus to perform well in lok sabha election in west bengal
Lok Sabha Elections 2024 : संदेशखालीचा फायदा उठविण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार का ?

पाणी वापर दिशाभूल –
कागल शहराची लोकसंख्या ४२ हजार असून दीड टीएमसी पाणी लागते. तर मग इचलकरंजीची लोकसंख्या साडेतीन लाख असल्याने त्यांचे अर्धा टीएमसीवर कसे भागेल? असा प्रश्न उपस्थित करून,  दिशाभूल करून सुरू असलेला पाणी नेण्याचा प्रयत्न हाणून पाडू,असा इशाराही यावेळी देण्यात आला.