अहमदनगरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडली असल्याची तथ्यहीन वृत्त प्रसिद्ध करण्यात येत आहेत असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे. शुक्रवारी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी अहमदनगरची जागा कॉंग्रेसला सोडल्याची वृत्तं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्या वृत्ताबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करूनही यासंदर्भातली माहिती दिली आहे.