शेतकऱ्यांवर अवकाळी पाऊस, गारपीठ, दुष्काळ अशी संकटे आल्यावर पवारसाहेब मदत करत होते. परंतु आज नुसत्या घोषणा केल्या जात आहेत. हे सरकार आहे की भिताड आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

चार महिने झाले दुधाचे ५०० कोटी रुपये अनुदान देण्याचे बाकी राहिले आहेत. कशी जगवायची जनावरं… कसं दुध देणार गायी…असा सवालही अजित पवार यांनी यावेळी विचारला. आम्ही कारखाने, उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करत होतो परंतु आजचे हे सरकार लक्ष देत नाहीय. अहो मंत्रीच ऊसाला एफआरपी देत नाहीत तर तुम्हाला काय मिळणार आहे ही अवस्था आज आहे अशी टीका अजित पवार यांनी केली.

mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
What should be carefully considered while taking a car loan
Money Mantra: वाहन कर्ज घेताना कोणत्या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावं ?
Sankashti Chaturthi 2024
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशी होतील मालामाल; गणपतीच्या कृपेने होणार धनसंपत्तीत वाढ
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

ज्याचं कुटुंब नाही… लग्न झालेले नाही अशा बिनसंसारी माणसाच्या… फकीराच्या हातात देश दिला असेल तर अशा माणसाला वाढलेली महागाई कशी लक्षात येईल असा टोला अजित पवार यांनी लगावला. आमचे सरकार असेपर्यंत ऊसाला साडेसहा रुपये दर देत होतो आणि हे सरकार ४ रुपये देत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती न समजणारे सरकार असेल तर काय अवस्था होते हे आज लक्षात येत आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आधी राममंदिर बांधणार मग सरकार असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. अरे चार वर्षे झोपला होतात का? असा सवाल करतानाच अरे उद्धवा अजब तुझे सरकार असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. माणसांच्या जाती काढून यांनी राजकारण केले आणि आता देवांच्या जाती काढून हे भाजपावाले राजकारण करत आहेत. यांच्या सुपीक डोक्यातून या कल्पना येत आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं. सत्तेची मस्ती यांच्या डोक्यात शिरलीय… सत्तेचा माज आलाय या सरकारला… हे तुमचं माझं सरकार नसून सुटाबुटातील लोकांचे आहे अशी टीका अजित पवार यांनी केली.