राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. आज (९ सप्टेंबर) झालेल्या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्यातील अनेक लोकं पवारसाहेबांना भेटत असतात. आपल्या काही समस्या मांडत असतात. त्यांच्या ‘त्या’ समस्या राज्याच्या प्रमुखाच्या कानावर घालून काही निर्णय घ्यायचा असेल. म्हणून पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असेल”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार पुढे म्हणाले की, “शरद पवार हे मुख्यमंत्र्यांना आज पहिल्यांदाच भेटत नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर देखील अनेकदा पवारसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. आज देखील लोकांच्या काही समस्यांवर निर्णय घेण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले असावेत. शरद पवार ५० वर्ष समाजकारण, राजकारण करत आहेत. त्यांच्या अवतीभवती देशाचं आणि राज्याचं राजकारण फिरत असतं. राज्याच्या प्रश्नाकरिता चारवेळा मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे.”

Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
AAP leader Kailash Gahlot
‘आप’ पक्षाला आणखी एक धक्का? मद्य धोरण प्रकरणात आणखी एक मंत्री ईडीसमोर हजर

बैठकीला मला बोलावलं नाही, म्हणजे…!

“या बैठकीला मला, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांना बोलावण्यात आलं नाही याचा अर्थ ही चर्चा राजकीय नसावी. पक्षीय चर्चा असती तर कदाचित आम्हाला बोलावलं असतं”,असंही स्पष्टीकरण देखील यावेळी अजित पवार यांनी दिलं आहे.

राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची बैठक

मुंबईत काल (८ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. राज्यातील आगामी निवडणुका, त्यासाठीची रणनिती, ओबीसींचं राजकीय आरक्षण या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. तसेच बैठकीत काही आजी माजी आमदारांनी आपल्या तक्रारी देखील मांडल्याची माहिती मिळते. सत्तेत असलेले शिवसेना आणि काँग्रेस मतदारसंघातील काम करत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी शरद पवार यांच्याकडे केली.