अजित पवारांना पाठविलेल्या प्रश्नावलीला समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल. लाचलुचपत विभागाची एक कार्यपद्धती आहे त्यात अजित पवारांनाही चौकशीसाठी हजर व्हावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी महाबळेश्वर येथे पत्रकारांना सांगितले.
राज्यातील सिंचन घोटाळ्याप्रकरणातील दोषींना सोडणार नाही. लाचलुचपत विभाग सिंचन घोटाळ्याची चौकशी करत असून त्या अंतर्गत अजित पवार यांच्याकडे चौकशी सुरू आहे.