अण्णा हजारे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
जळगावमधील घरकुल घोटाळय़ाच्या खटल्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्या रद्द करून सरकार सुरेश जैन यांना तुरुंगाबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला,.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर यासंदर्भात कोणाचा दबाव आहे, असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, या खटल्यात विशेष कामगिरी करणाऱ्या दोन्ही वकिलांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यास आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.