“डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी GDP नोंदवला, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर ७.५% राहिला, त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला. असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे.” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी GDP नोंदवला, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर ७.५% राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या @Dev_Fadnavis यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे. — Balasaheb Thorat (@bb_thorat) September 19, 2020 याचबरोबर थोरात यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील उच्चांकी विकासदर पाहून, पोटशूळ झालेल्या मोदी सरकारने विकासदराची वाढ मोजण्याचे परिमाण बदलून, अपयश झाकण्याचा प्रयत्न केला पण तो ही अपयशी ठरला. कारण पुढे प्रत्येक तिमाहीत विकासदर मोदींच्या विश्वासहर्तेप्रमाणे वेगाने घसरत आहे. याउलट अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रसातळ काय असतो, याची अनुभूती जनतेला झाली आहे. याच तिमाहीत देशाच्या जीडीपीने उणे २३.९ टक्के अधोगतीचा दर गाठलेला आहे. गेल्या सहा वर्षात भारताच्या विकास दराला सातत्याने उतरती कळा लागल्याचे आपण पहात आहोत.” असं त्यांनी म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील उच्चांकी विकासदर पाहून पोटशूळ झालेल्या @narendramodi सरकारने विकासदराची वाढ मोजण्याचे परिमाण बदलून अपयश झाकण्याचा प्रयत्न केला पण तो ही अपयशी ठरला. कारण पुढे प्रत्येक तिमाहीत विकासदर मोदींच्या विश्वासहर्तेप्रमाणे वेगाने घसरत आहे. — Balasaheb Thorat (@bb_thorat) September 19, 2020 आणखी वाचा- पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणे हीच फडणवीसांची खंत- उदय सामंत ४६ वर्षातील उच्चांकी बेरोजगारीचा दर - बेरोजगारीच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “या वर्षी इतिहासात प्रथमच उणे ९ विकास दर राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्त करत आहेत. गेल्या ४६ वर्षातील उच्चांकी बेरोजगारीचा दर हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच भारताने नोंदवला आहे.दर वर्षी २ कोटी रोजगार देणार असे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत १२ कोटी रोजगार निर्माण करण्याऐवजी असलेले १२ कोटी रोजगार घालवले. GST परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असताना केंद्र सरकार हात वर करत आहे. मोदींच्या प्रतापाने देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.” ३८ घोटाळेबाज देश सोडून पळून गेले - बँक क्षेत्र रसातळाला गेले असल्याचे सांगत, “आपण चीनला बेटकुळ्या फुगवून दाखवत आहोत असा दिखावा करायचा आणि चिनी बँकांकडून कर्ज घेऊन भारतात घुसखोरी करणा-या चीनला क्लीन चीट द्यायची, हे मोदींच्या काळातच होत आहे. मोदींच्या काळात रिझर्व्ह बँकेतून लाखो कोटी रुपये काढून घेतले, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा सपाटा सुरु आहे. बँकिंग क्षेत्र रसातळाल गेले असून बँकांना लुटणारे मेहुल चोक्सी, नीरव मोदी सारखे ३८ घोटाळेबाज देश सोडून पळून गेले आहेत. देशातील अनेक उद्योगधंदे बंद होत असताना केवळ मोदींच्या काही मित्रांच्या हाती देशाचे उद्योग रहावेत असे प्रयत्न मोदी सरकार करत आहे.” असा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला. बँकिंग क्षेत्र रसातळाले गेले असून बँकांना लुटणारे मेहुल चोक्सी, निरव मोदी सारखे ३८ घोटाळेबाज देश सोडून पळून गेले आहेत. देशातील अनेक उद्योगधंदे बंद होत असताना केवळ मोदींच्या काही मित्रांच्या हाती देशाचे उद्योग रहावेत असे प्रयत्न मोदी सरकार करत आहे. — Balasaheb Thorat (@bb_thorat) September 19, 2020 आणखी वाचा- पुतळा उभारण्याला विरोध; ते पैसे कोविडसाठी वापरावेत : प्रकाश आंबेडकर तसेच, मोदी सरकारच्या काळात लोकशाहीचे अधःपतन झाले आहे. प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत रसातळाला गेला आहे. संवैधानिक यंत्रणांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. कामगार विस्थापित झाला, स्थलांतरीत मजुरांची अवस्था लॉकडाउनमध्ये देशाने पाहिली आहे, असेही थोरात यांनी म्हटले आहे. मोदींच्या विश्वासहर्तेनेही रसातळ गाठला आहे. देशात सामाजिक विद्वेष परमोच्च स्तरावर आहे. राज्या राज्यांमध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सरकारविरोधात साम-दाम-दंड भेद निती वापरायची, आमिषे दाखवयाची, यंत्रणांची भिती दाखवून आमदार, खासदार फोडायचे. — Balasaheb Thorat (@bb_thorat) September 19, 2020 राज्या राज्यांमध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न सुरु - याचबरोबर बाळासाहेब थोरा यांनी मोदी सरकार राज्या-राज्यांमध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला आहे. “नोटबंदीमुळे असंघटीत क्षेत्र पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. करोना रुग्णांच्या संख्येमध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून पहिल्या क्रमांकाकडे घोडदौड करत आहे. दररोज कोरोना बाधितांच्या वाढीचा वेग हा गिनिज बुकात नोंदवण्यासारखा आहे. चीनने आपला भूभाग व्यापला आहे. मोदींच्या विश्वासहर्तेनेही रसातळ गाठला आहे. देशात सामाजिक विद्वेष परमोच्च स्तरावर आहे. राज्या राज्यांमध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधी पक्षांच्या सरकारविरोधात साम-दाम-दंड भेद निती वापरायची, आमिषे दाखवयाची, यंत्रणांची भिती दाखवून आमदार, खासदार फोडायचे. जनतेला मदत करण्याऐवजी जाहिराती, निवडणुकीला खर्च करायचा. निवडणुकीत भाजपालाच कॉर्पोरेट्सकडून मदत मिळेल यासाठी इलेक्टोरल बाँड्सची व्यवस्था करायची. जो विरोधात आवाज उठवेल त्याच्यावर देशद्रोह, युएपीए सारख्या कायद्याखाली खटले भरायचे आणि त्यांना जामीन मिळू नये याची व्यवस्था करायची. धार्मिक द्वेष व दंगे पसरवणाऱ्यांना व त्यांच्या समर्थकांना मात्र सरकारी संरक्षण द्यायचे, यापेक्षा लोकशाहीचे अधःपतन असूच शकत नाही. यापेक्षा वेगळी रसातळाची व्याख्या होऊ शकत नाही.” असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.