मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळ झालेल्या अपघातात मोटर सायकल अपघातात एक जण ठार झाला. आदित्य रामचंद्र खताळ असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातो आहे.  हा अपघात सोमवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर शेतपळस गावाच्या हद्दीत घडला. पेणहून नागोठणे बाजूकडे येणाऱ्या एमएच ०६ बी एल ८७४५ या होंडा शाइन मोटरसायकलला वडखळ बाजूकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आदित्य रामचंद्र खताळ (वय २०) रा. खेमवाडी, ता. सुधागड हा मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला.

या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध जारी असून पो. निरीक्षक बाळासाहेब दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे हे. कॉन्स्टेबल ए. बी. पाटील पुढील तपास करीत आहेत.