महाराष्ट्रातील जनतेमध्ये सध्या कॉंग्रेसविरोधी भावना असून, त्याच एकत्रित करून भारतीय जनता पक्ष राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार उलथवून टाकेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नागपूरमध्ये व्यक्त केला.
ते म्हणाले, राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडी सरकारला दूरदृष्टी नाही. शासनशून्यता हेच या सरकारचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळेच सरकारविरोधातील सर्वसामान्यांच्या भावना एकत्रित करून राज्यातील आघाडी सरकार आम्ही उलथवून टाकू.
नरेंद्र मोदी यांना पक्षाचा प्रचारप्रमुख केल्यामुळे मुस्लिम मते भाजपपासून दुरावतील, ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, मोदींचे नाव बदनाम करून कॉंग्रेस मुस्लिमांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.