राज्यात निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपात मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपावरून कलगीतुरा रंगला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीचं झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्तेचं समसमान वाटप होईल असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला आहे. तर अशी काही चर्चा झाली नाही, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. १८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्याबरोबरच राज्यातील विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना-भाजपानं घेतला होता. याची चर्चा भाजपाध्यक्ष अमित शाह, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी युती करताना नेमकी काय चर्चा झाली याची माहिती दिली होती.