राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यांसंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केलेले आहेत. मात्र तरी देखील संसर्ग कमी होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून राज्यभरासाठी लॉकडाउनची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला उद्देशून समाज माध्यमांवरून संबोधित करणार आहेत. आज मुख्यमंत्री नेमका कोणता निर्णय जाहीर करणार? याकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संबोधित करणार असल्याबद्दल सीएमओच्या अधिकृत ट्विट हॅण्डलरवरून माहिती देण्यात आलेली आहे. या अगोदर वेळोवेळी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनबाबत इशारा दिलेला होता. मागील काही दिवसांमध्ये त्यांनी तज्ज्ञांसह सर्वपक्षीय बैठक घेत विरोधी पक्षांसह राज्यभरातील नेते मंडळींशी देखील चर्चा केलेली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सरकारला लॉकडाउनचा निर्णय घ्यावा लागेल, असं बोलून दाखवलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधतील. CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state at 8:30pm tonight (13th April 2021). Link: pic.twitter.com/BSu01oIX5Q — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 13, 2021 Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील – अस्लम शेख लॉकडाउनचा निर्णय जवळपास निश्चित झाला असून, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही याला आज दुजोरा दिलेला आहे. “विषाणूची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतोय. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करतोय. पण कुठेही कमतरता दिसत नाही म्हणून मला असं वाटतंय की, राज्य सरकारचा आज यासंदर्भातील मोठा निर्णय घेणार.” असं अस्लम शेख यांनी सांगितलं आहे.