महाविकास आघाडीची सत्ता असल्याने मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. भाजपाची सत्ता असती तर मुंबईही पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवणं हा भाजपाचा डाव आहे. तो डाव मोडून काढला पाहिजे असं ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे. #महाविकासआघाडी सरकारची सत्ता आहे म्हणून आज मुंबई व महाराष्ट्र शांत आहे. @BJP4Maharashtra ची सत्ता असती तर दिल्ली प्रमाणे मुंबई सुध्दा पेटवली गेली असती. देशात दंगे भडकवणे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचा #भाजपा चा डाव आहे. तो मोडून काढला पाहिजे. — Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 3, 2020 याआधी जय श्रीरामच्या घोषणेवरुनही सचिन सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपावर टीका केली आहे. सचिन सावंत म्हणतात. देता येत नाही तरुणांच्या हातांना काम, देतात घोषणा जोरात जय श्रीराम जय श्रीराम! हाती हवे ज्यांच्या पेन, पेन्सिल आणि पाठीवर दप्त ते गल्लीबोळात फिरतात घेऊन मशाली आणि पत्थर. घरात नाही पैसा अडका संपले सर्व दाणा-पाणी माय पुसे लेकाला बेटा पाह्य काम देतं का कोनी? पोरगा म्हणे काम तर मिळत नाय पण फिकर नाय शोधतोय म्यां गद्दार पाकिस्तानी ते काम महत्त्वाचं हाय मोदी म्हंत्यात तान भूक इसरा देशासाठी कष्ट भोगा देशात त्यांना राह्यचं तर जय श्रीराम कहना होगा माय म्हणे मोदींना सांग गरीबांवर असा काढू नका राग त्यांचं आपलं एकच रगात गरीबांच्या पोटाला एकच आग चला बोलू सगलेच आपन वंदेमातरम आनी जय श्रीराम कमलवाल्यांनो किरपा करा द्या पोटाला भाकरी आनी हाताला काम अशा ओळीही सचिन सावंत यांनी ट्विट केल्या आहेत आणि भाजपावर टीका केली आहे.