देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी ६५२ झाली असून बाधितांची संख्या २० हजार ४७१ इतकी झाली. मंगळवारच्या तुलनेत बळींच्या संख्येत ४९ ने तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येत १९८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोनाच्या सक्रीय प्रकरणांची संख्या १५ हजार ८५९ इतकी आहे. ३९५९ लोक बरे होऊ त्यांनी सुटी देण्यात आली आहे. तर एक रुग्ण स्थलांतरित झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी १९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.