लॉकडाउनचा दुसरा टप्पा आज संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ मे रोजी सोमवारपासून तिसऱ्या टप्याची घोषणा केली. तिसऱ्या टप्प्यात केंद्राकडून अनेक उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे. ४ मेपासून सुरू होणाऱ्या टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली; तसेच ई-कॉमर्स कंपन्यांकरवी जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंच्या विक्रीचीही मुभा दिली जाईल, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने करोनावर विजय मिळवला आहे. मात्र, ही लढाइ अद्याप संपलेली नाही. देशविदेशातील तसेच मुंबई पुण्यासह राज्यातील करोनाविषयीची माहिती वाचा एका क्लिकवर..