करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत गेल्या २४ तासात विक्रमी वाढ झाल्याने, देशभरातील करोनाबाधितांचा आकडा शनिवारी ३ हजारांच्या पलीकडे गेला. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता वाढत चालली आहे. रविवारी रात्री ९ वाजता देशातील जनतेने ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे, मोबाइल फ्लॅशलाइट्स लावावे असे आवाहन मोदी यांनी केले होते. त्याला देशवासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. रात्री नऊनंतर काही वेळासाठी जनतेने घरातील लाइट्स बंद ठेवले होते. मात्र काही ठिकाणी काही जण रस्त्यावर एकत्र येऊन फटाके फोडतानाही दिसले.