देशात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती काही प्रमाणात निवळत आहे. तर दुसरीकडे मुंबई, महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील स्थिती चिंताजनक आहे. लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर परिणाम झाला आहे. पण, दररोज वाढत चाललेल्या रुग्णांमुळे आरोग्य विभागालासमोर आव्हान उभं राहत आहे. त्यामुळे लॉकडाउन लांबत जाणार असं चित्र सध्या मुंबई आणि महाराष्ट्रात आहे.