करोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रासमोर एक नैसर्गिक आपत्ती रौद्ररूप धारण करून उभी ठाकली आहे. मंगळवारपासून कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आलं आहे. चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत असून, रायगडसह किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, ठाणे, रायगडसह पुण्यातील काही भागाला तडाखा बसणार आहे.