मुंबई : राज्यात करोनाबाधित रुग्णांचा दैनंदिन आकडा हा ४९ हजार ४४७ एवढा असून, २७७ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्याही चार लाखांवर गेली.

करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून प्रथमच दिवसभरात ५० हजारांच्या आसपास नवे रुग्ण आणि चार लाखांपेक्षा अधिक उपचाराधीन रुग्णांची संख्या झाली. दिवसभरात ३७,८२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले.

दिवसभरात नाशिक शहर २४५९, पुणे शहर ५७७८, पिंपरी-चिंचवड २७९८, उर्वरित पुणे जिल्हा २२९७, औरंगाबाद शहर ७०४, नांदेड जिल्हा १२१६, नागपूर शहर २८५३ अणि उर्वरित नागपूर जिल्हा १०९०, भंडारा ८३७, बीड ४४८, सातारा ६८८, नंदुरबार ८२०, जळगाव जिल्हा १३०४, नगर जिल्हा १९६४, पनवेल शहर ५६६.

मृतांमध्ये सर्वाधिक पुणे शहर ३७,  नाशिक शहर १५, औरंगाबाद शहर ३१, नांदेड शहर १३, नागपूर शहर २१, उर्वरित नागपूर जिल्हा १४ जणांचा समावेश आहे.

उपचाराधीन रुग्णांमध्ये पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक ७३,५९९ रुग्ण आहेत. मुंबई ६०,८४६, नाशिक ३१,५१२,  औरंगाबाद १४,३०२, नागपूर जिल्हा ५२,४०८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत मृतांची संख्या वाढली

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या दर दिवशी नवनवीन उच्चांक गाठत असताना आता मृतांची संख्याही वाढू लागली आहे. शनिवारी ९०९० नवीन रुग्ण आढळले, तर २७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. शनिवारी ४३ हजार ५९७ चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे.  उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढत असून ६२ हजारांवर पोहोचली आहे, तर करोनामुक्त रुग्णांचा दर घटला असून ८३ टक्के  झाला आहे. मुंबईत शनिवारी ९०९० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या चार लाख ४१ हजार २८२ झाली आहे. एका दिवसात ५,३२२ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत तीन लाख ६६ हजार ३६५ म्हणजेच ८३ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  मुंबईतील गंभीर रुग्णांची संख्या ९८२ झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ४ हजार ९३१ नवे रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ४ हजार ९३१ नवे करोना रुग्ण आढळून आले, तर १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवली क्षेत्रातील रुग्णसंख्या एक हजारपार गेली आहे. जिल्ह्य़ात शनिवारी ४ हजार ९३१ करोना रुग्णांपैकी ठाणे महापालिका क्षेत्रात १४२७, कल्याण डोंबिवली १२४१, नवी मुंबई १२०५, मीरा-भाईंदर ३४९, बदलापूर २०६, उल्हासनगर १६३, भिवंडी १४१, अंबरनाथ ११८ आणि ठाणे ग्रामीणमधील ८१ रुग्णांचा समावेश आहे.

४९ टक्के  रुग्ण पश्चिम उपनगरात

मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या पुढे गेली असून या रुग्णांपैकी तब्बल ४९ टक्के  म्हणजेच २७ हजारांहून अधिक रुग्ण हे पश्चिम उपनगरातील आहेत, तर २१ टक्के  म्हणजेच ११ हजारांहून अधिक रुग्ण अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथील आहेत. गेल्या वर्षी मुंबईत रुग्ण वाढत होते तेव्हाही पश्चिम उपनगरातच रुग्णांची संख्या अधिक होती. उपचाराधी रुग्णांपैकी २७,०११ रुग्ण के वळ पश्चिम उपनगरात आहेत. के वळ अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथे ११,६२३ रुग्ण आहेत. मुंबईत आठ विभाग असे आहेत जिथे तीन हजारांहून अधिक उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि मुलुंड व घाटकोपर यांचा समावेश होतो. अंधेरी-गोरेगाव परिसरांत सर्वाधिक मॉल, उपाहारगृह, हॉटेल, पब, मद्यालये आहेत. येथील उच्चभ्रू वर्ग हा अशा वातावरणातला आहे. त्यामुळे लोकांमध्ये मिसळणे, पार्टी करणे याचे प्रमाण इथे खूप आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.