परभणीतील पाथरी या ठिकाणी कर्जमाफीच्या मागणीसाठी बँकेसमोर उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याचा आज दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तुकाराम काळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. तो मरडसगावचा रहिवासी आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह बँक प्रशासनाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवल्याशिवाय मृत शेतकऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पवित्रा भाकपचे नेते कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्त्वाखाली घेण्यात आला. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केले.