पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान आणि कळमोडी या धरणांमध्ये विनावापर पडून राहिलेले पाणी सोलापूरच्या उजनी धरणात सोडावे आणि उजनी धरणातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रश्नावर येत्या सोमवारी पुण्यात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत बठक आयोजित केली होती. परंतु ती स्थगित करण्यात आल्यामुळे सोलापूरच्या पाणी प्रश्नाचा तिढा इतक्यात सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.
भामा आसखेड धरणात ६.५ टीएमसी, चासकमान धरणात ४.५ टीएमसी आणि कळमोडी धरणात १.५ टीएमसी याप्रमाणे तिन्ही धरणांमध्ये मिळून १२.५ टीएमसी इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे. या पाण्याचे कोठेही वाटप नियोजन नाही. या तिन्ही धरणांना एकही कालवा नाही. उजनी धरणात हे पाणी सोडण्यासाठी मधले अंतर केवळ ३० किलोमीटर आहे.
यापूर्वी २००२ साली आपण पुण्याचे पालकमंत्री होतो, त्यावेळी इकडे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट पसरले होते. तेव्हा पुण्यातून अशाच पध्दतीने उजनी धरणात पाणी सोडण्यात आले होते. त्याच पध्दतीने आतादेखील पुणे जिल्ह्यात विना वापर शिल्लक असलेले पाणी उजनी धरणात सोडावे, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी शासनाकडे केली आहे. उजनी धरणात सध्या उणे साडेसहा टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो ठेवला गेला आहे. उजनी धरणाच्या वर १९ धरणे आहेत.यात उजनी धरण हे शेवटच्या टोकाला आहे. पुण्याहून या धरणात पाणी सोडल्यास आणि नंतर लगेचच उजनीतून उजव्या व डाव्या कालव्यातून तसेच भीमा-सीना बोगद्यातून पाण्याचे दोन आवर्तने निघू शकतात. उजनी धरणाच्या सिंचन क्षेत्रात दोन लाख एकर शेती आहे.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
Gutkha worth 21 lakh seized at different places in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?