विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. त्यात त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असंही म्हटलं आहे… हा निर्णय होता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंदर्भातील. ही फेलोशिप बंद होणार असल्यानं याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे पत्र फडणवीस यांनी टि्वटही केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या शासनाच्या निर्णचाया पुनर्विचार व्हावा, अशी मागणी केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री सचिवालयात दिले आहे.

Karnataka CM Siddaramaiah calls PM Modi nalayak loksabha election 2024
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींना म्हटले ‘नालायक’; ‘चंबू’वरुन राजकारण का तापलंय?
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!

“या फेलोजचा मी कधीही राजकीय वापर होऊ दिलेला नाही. फेलोजनी नेहमी प्रशासनासोबत काम केले,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

सध्या कार्यरत असलेल्या फेलोजचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच मार्च महिन्यात त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश जात आहे, असे मला प्रकर्षाने वाटते. किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची तरी संधी मिळावी असे मला आवर्जून वाटते, असेही फडणवीस यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.