विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. त्यात त्यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असंही म्हटलं आहे. हा निर्णय होता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासंदर्भातील. ही फेलोशिप बंद होणार असल्यानं याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. हे पत्र फडणवीस यांनी टि्वटही केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याच्या शासनाच्या निर्णचाया पुनर्विचार व्हावा, अशी मागणी केली आहे. १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी हे पत्र मुख्यमंत्री सचिवालयात दिले आहे. "या फेलोजचा मी कधीही राजकीय वापर होऊ दिलेला नाही. फेलोजनी नेहमी प्रशासनासोबत काम केले," असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. I have written to CM Uddhav ji Thackeray to reconsider Government’s decision to stop the CM fellowship program abruptly, in the middle of the batch. By involving youth, Government gains from their ideas, innovation and energy. pic.twitter.com/I9cTACAsaB — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2020 सध्या कार्यरत असलेल्या फेलोजचा कार्यकाळ जुलै, ऑगस्ट महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच मार्च महिन्यात त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या निर्णयामुळे युवकांमध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश जात आहे, असे मला प्रकर्षाने वाटते. किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची तरी संधी मिळावी असे मला आवर्जून वाटते, असेही फडणवीस यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.