राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत होती. राज्यातील अनेक तळी, विहिरी कोरडया पडल्या आहेत. पाण्याची, चाऱ्याची गंभीर स्थिती आहे.हीच बाब ध्यानात घेऊन महाराष्ट्र सरकारने २६ जिल्ह्यांतील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. ११२ तालुक्यात गंभीर आणि ३९ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ सरकारने जाहीर केला आहे.

जळगाव, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक दुष्काळी तालुके आहेत. कमी पाऊस, भूजल कमतरता, शेतीची स्थिती आणि पेरणीखालील क्षेत्र या बाबी ध्यानात घेऊन दुष्काळ जाहीर करण्यात आला. पुढच्या सहा महिन्यांसाठी दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी तालुक्यांमध्ये आवश्यक उपायोजना अंमलात येणार आहेत.

lok sabha election 2024, nagpur district collector, offices, education institutes
लोकसभा निवडणुकीसाठी मनुष्यबळ, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला ६७० कार्यालय-शाळांचा खो
jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
kolhapur fight between two groups , kolhapur violence marathi news,
कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी यात्रेत दोन गटांत मारहाण; अ‍ॅट्रोसिटीसह परस्परविरोधी गुन्हे दाखल
Unseasonal rain in some parts of Nashik district
नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट

पालकमंत्र्यांनी दुष्काळी भागांचा दौरा करुन त्याबाबतचा आपला अहवाल सरकारला दिल्यानंतर १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली होती.