राज्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत. राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरुन राजकारण सुरु असतानाच निकालानंतर जवळजवळ रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडणारे राऊत हे सोशल नेटवर्किंगवरही चर्चेचा विषय ठरत आहेत. संजय राऊत यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. त्यांच्या याच प्रवासावर टाकलेली नजर. दरम्यान, संजय राऊत यांच्या नावाची दिल्लीपासून सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा आहे. 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' हीच भूमिका ते निकालानंतर सातत्याने मांडत आले आहेत.