सततची नापिकी, डोक्यावर झालेले कर्जाचे ओझे कसे फेडावे या विंवचनेत असलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हदगाव तालुक्यातील लोहा येथे घडली.  खोब्राजी लिंबाजी टिंबे (वय ३०) असे त्यांचे नाव आहे. खोब्राजी टिंबे यांनी एसबीआय तामसा येथील बँकेचे कर्ज घेतले होते. घेतलेले कर्ज कसे फेडावे या काळजीने त्रस्त होते. गुरुवारी खोब्राजी टिंबे हे शेताला चाललो असे सांगून घरातून गेले व आपल्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. या प्रकरणी तामसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोद केली आहे.