औरंगाबादमधील पुंडलिकनगर येथून गेल्या २६ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत देवळाई शिवारात मंगळवारी दुपारी ४.३० अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. गोदावरी गणेश खालसे (३३) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पतीचे २०१२ मधे निधन झाले आहे. गोदावरी यांना दोन मुले असून एक ४ व एक ८ वी इयत्ते मध्ये शिकतो.

देवळाईतील साईटेकडी जवळील तलाव परिसरात गोदावरी यांचा मृतदेह आढळला. डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे. मृतदेह हाती लागला तेव्हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. चिकलठाणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे.