नागपूर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेले पाचगाव हे देशातील पहिले वायफाय युक्त गाव घोषीत करण्यात आले आहे. या गावातील लोकसंख्या पाच हजारांच्या जवळपास असून गावातील युवक युवतींमध्ये या घटनेमुळे आनंदव्यक्त केला जात आहे. महत्वाचं म्हणजे वाय फाय युक्त होण्यापूर्वी या गावात एकही सायबर कॅफे नव्हता, विद्यार्थी व गरजवंतांना १८ कि.मी अंतरावर असलेल्या नागपूरला जावं लागंत होतं परंतू आता गावच वाय फाय झाल्याने पाचगावचे रहिवासी व गाव या दोन्ही गोष्टी चर्चेत आहेत.