वडवणीकडून बीडकडे येणार्या रिक्षाला ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार घडली. बीड-परळी रस्त्यांवर पांगरबावडी येथे हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून ते सर्व बीड शहरातील शाहुनगरमधील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवणी येथून प्रवाशी रिक्षा बीडकडे प्रवाशी घेवून येत होता. रिक्षा पांगरबावडी जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे जाणार्या ट्रक (क्र.एन. एच. 09 सी.व्ही. 9644) ने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत जखमींना नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी पाठवले. दरम्यान, याच ट्रकचालकाने घोडका राजूरी येथे आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जाते. तबसुम अकबर पठाण, सारो सत्तार पठाण, रिहाण अबजान पठाण (वय १३), तम्मना अबजान पठाण (वय १०) मदिना पठाण यांचा या अपघात मृत्यू झाला आहे.