सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका शाळेत शनिवारी माध्यान्ह भोजनातून तब्बल ४०० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला. यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या गंभीर असून त्यांना उपचापरासाठी तातडीने सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. येथील कोर्टी गावात असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. माध्यान्ह भोजन सेवन केल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळणे आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. सुरूवातीला त्यांच्यावर गावातील स्थानिक दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र, त्यामधील २० विद्यार्थ्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना उपचारासाठी करमाळ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.