डहाणू लोकसभा क्षेत्रातून पाच वेळा खासदारपदी निवडून आलेले दामू शिंगडा (६७) यांचे आज(रविवार) सायंकाळी वसई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान करोनामुळे निधन झालं. १९७९ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक जिंकून त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी १९८० मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. १९८०, १९८४, १९८९, १९९१ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या दामू शिंगडा यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व करताना अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्ह्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेशी ते निगडित होते.