आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱयांच्या गाडीला झालेल्या अपघातात चार वारकऱयांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तुळजापूर-लातूर रस्त्यावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या रस्त्यावरील ताकविकी गावाजवळ कार आणि जीपमध्ये समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्येच चार वारकऱय़ांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण कर्नाटकातील बिदरमधील राहणारे आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
(संग्रहित छायाचित्र)