अकोला : खामगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज, ३० मे रोजी रात्री घडली.

खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकिर भूरू पटेल (२२), भुरू घासी पटेल (५२), जावेद भूरू पटेल (२५) व साजेदा बी भूरू पटेल (५०) हे घरात असताना तारेचा स्पर्श होऊन जोरदार विजेच्या धक्का बसला. त्यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जावेद याचे ७ जून तर जाकिर याचे ८ जूनला लग्न होणार होते. एकाची सासरवाडी वाशीम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगावमधील असल्याची माहिती आहे.