यवतमाळ : लग्न समारंभात वऱ्हाडी म्हणून आलेल्या हिंगणघाटच्या एकाच कुटुंबातील चार तरुणांचा कळंब तालुक्यातील वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
 किशोर राजू महाकाळे (२०) विजय महाकाळे (१९), विक्की महाकाळे (१८) आणि सचिन महाकाळे (२०) अशी त्या चौघांची नावे आहेत. किशोरला वाचविण्यासाठी गेलेल्या तिघांनी एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने नदीत उडय़ा घेतल्या होत्या.