भूजल पातळी वाढविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

विरार :  यंदा वसई-विरार परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडला असली तरी भूजल पातळी कमीच आहे. वैज्ञानिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वाढते शहरीकरण आणि जिल्ह्याच्या भौगोलिक संरचनेमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढत नाही. यासाठी कोणत्याही उपाययोजना राबविल्या जात नसल्याने भविष्यात वसई तथा पालघर जिल्ह्याला पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

वसई-विरार शहरात ३१ ऑगस्ट पर्यंत २४३२ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या वसईतील सर्वच जलस्रोत पूर्णत: भरले आहेत. असे असतानाही दुसरीकडे मागील पाच वर्षांपासून वसई-विरार तथा पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी मात्र दरवर्षी कमी होत आहे. ऑक्टोबर २०१९ च्या भूजल सर्वेक्षण आणि विकास योजना पालघर यांच्या सर्वेक्षणानुसार मागील पाच वर्षांत वसई तालुक्याच्या भूजल पातळीत सरासरीपेक्षा ०.५९  मीटरची घट आली आहे. ही घट सातत्याने वाढली जात आहे. केवळ पावसाळ्यात पाणी पातळी वाढली जाते. पण जमिनीत पाणी मुरून साठवण्याची कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याने येणाऱ्या काळात पाणी कमी पडणार आहे.

वसई-विरार परिसरात इतर वेळी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कूपनलिका, विहिरी व बावखळ, शेततळे यांच्यातून पाण्याचा बेसुमार उपसा केला जात असल्याने वसई-विरार परिसरातील भूजल पातळी खालावली आहे. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली बांधकामे आणि वाढती वृक्षतोड, बोडके होणारे डोंगर यामुळे जमिनीची धूप मोठय़ा प्रमाणत होऊन जमिनीची आद्र्रता कमी होत असल्याने पाण्याचे बाष्पीभवन होऊन जमिनीचा जलस्तर कमी होत आहे.

वसईत साधारणत: दीड कोटी लिटर पाण्याचा उपसा केवळ टँकरवाले करत असल्याची पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी दिली आहे. महापालिका तलाव सुशोभिकरणाच्या नावाखाली तलावाला सिमेंटच्या भिंती बांधत असल्याने तलावाचे झरे नष्ट होत आहेत, आणि लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी घरात लावलेले वॉटर प्युरिफायर (पाणी शुद्धीकरण यंत्र) यामुळे दोन तृतीयांश पाणी वाया जाते, यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे.

समाधानकारक पाऊस पडला असला तरी भौगोलिकदृष्टय़ा जमिनीचे भूस्तर हे खडकाळ असल्याने पाणी जमिनीत थांबत नाही. यासाठी भूस्तराची पाहणी करून रिचार्ज शाफ्टची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पाण्याचा उपसा नियंत्रणात आणला पाहिजे. बोअरवेलला परवानगी बंद केल्या पाहिजे.

– प्रमोद पोळ,  पालघर प्रभारी वरिष्ठ भू-वैज्ञानिक

वसई-विरार महानगरपालिका रिचार्ज शाफ्टचे काम हाती घेणार आहे, यासाठी आमची भू-वैज्ञानिक यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका

मागील ३० वर्षांत प्रशासनाने जलसंवर्धनासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. पाणी माफिया दिवसेंदिवस जमिनीतून लाखो लिटर पाणी उपसा करत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात वसईवर जलसंकट कोसळणार आहे.

– समीर वर्तक, पर्यावरण संवर्धन समिती, वसई