१ ऑगस्ट पासून मासेमारी हंगाम सुरू झाले असून पालघर जिल्ह्यातील २८१ बोटी मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणपट्टी व समुद्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला असून, या बोटीना खराब हवामानाला तोंड द्यावे लागत आहे. यापैकी अधिकतर बोटी परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सातपाटी मुरबे येथील २३८, वसई तालुक्यातील ३७ व डहाणू तालुक्‍यातील सहा बोटी १  व २ ऑगस्ट रोजी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या.

हवामान विभागाकडून खराब हवामानाविषयी किंवा मुसळधार पावसाविषयी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना मिळाली नसल्याने या बोटीना सुचित केल्या गेले नव्हते. सद्यस्थितीत या बोटी खराब हवामान व मुसळधार पावसाला तोंड देत आहेत. मात्र, कुठल्याही बोटीला धोका नसल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाची माहितीी सहाय्यक आयुक्त अजिंक्य पाटील यांनी दिली. या सर्व बोटी सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही ते म्हणाले.

जिल्ह्यातील ५० ते ६० मासेमारी बोटी किनाऱ्यावर परतल्या असून, इतर बोटी परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांना करून देण्यात येत आहे.