मुंबईहून नाशिककडे भरधाव निघालेल्या इनोव्हाने शहापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या लोकांना चिरडले. यात ४ ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, यात चौघांचाही जागीच मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी, मुंबईहून नाशिककडे निघालेल्या इनोव्हा चालकाचे शहापूरजवळ आल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटले. चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर इनोव्हा खोल खड्ड्यात जाऊन आदळली. यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. यात इनोव्हा चालकाचाही समावेश आहे. अपघातानंतर त्वरीत मदतकार्य सुरु करण्यात आले. पोलीसही घटनास्थळी धावले. जखमींवर ठाणे उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.