जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर गुरुवारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात निळवंड आणि मुळा या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. पाणी मार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जायकवाडी धरणातील जलाशयात निर्माण झालेली तूट भरुन काढण्यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकारणाने नगर- नाशिक जिल्ह्यांमधील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय होता. घेतला ८.२२ टीएमसी पाणी या धरणांमधून सोडण्यात येणार होते. या निर्णयाला अहमदनगर – नाशिक जिल्ह्यांमधून विरोध होत होता. या निर्णयाविरोधात पद्मश्री विठ्ठलराव विखे – पाटील सहकारी साखर कारखान्याने सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली होती.

बुधवारी सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली असता कोर्टाने ही याचिकाच फेटाळून लावली. त्यामुळे जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गुरुवारी सकाळी निळवंड आणि मुळा या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. निळवंड धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून सहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर मुळा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून तिथूनही सहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन

69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार

Farmers aggressive
गडचिरोली : ‘एमआयडीसी’ भूसंपादनप्रकरणी शेतकरी आक्रमक; जमीन मोजणीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना परत पाठवले

Bullying of the driver and three hours of traffic on the highway
वाहन चालकाची दादागिरी… अन् महामार्गावर तीन तास कोंडी