११ वी विषयाच्या संस्कृत सारिका या नावाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दाखवण्यात आली आहे. महाराजस्यया वंशावळीत शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचा उल्लेख ‘पत्नी’ म्हणून करण्यात आला आहे. हे संस्कृत विषयाचे पुस्तक अतिशय वादग्रस्त असून महाराजांची बदनामी करण्याचा हा कट जाणीवपूर्वक केला जातो आहे का? असा प्रश्न संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला आहे.

संस्कृत सारिका हे लातूरच्या निकिता पब्लिकेशनचे पुस्तक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) यांनी लिहिले आहे. त्यांनी शिवाजी महाराजांच्या मातेचा उल्लेख पत्नी म्हणून कसा केला? इतिहासाचा विपर्यास करण्यासाठी हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला खोडसाळपणा आहे असेही संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
nagpur and bhandara,dhirendra shastri, bageshwar dham, controversial statement, jumdev maharaj, followers, Sparks Outrage, fir register, arrest demand, maharashtra, marathi news,
बागेश्वर बाबा वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत, जुमदेव महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; भंडारा, नागपूरमध्ये तणाव

संस्कृत सारिका हे वादग्रस्त पुस्तक त्वरित रद्द करावे. संबंधित पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊंची बदनामी करणाऱ्या सगळ्यांवर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी लेखक, वितरक, प्रकाशकव अभियानाचे प्रमुख यांच्यावर महापुरुषांची बदनामी प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने केली आहे.

इ. ११ वी. च्या आभ्यासक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची ‘पत्नी’ दाखवले आहे. असा भयंकर बदनामी करणारा मजकूर माध्यमिक महाविद्यालयांच्या मुलांना आभ्यासासाठी पुस्तकात छापला व शिकवला जातो हे भयानक खोटेपणा आहे. हा राज्य सरकारचा भोंगळ कारभार आहे… हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राज्याचा शिक्षण विभाग ‘विनोदाच्या तावडीत’ सापडला आहे असाही आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.