नागपूर टुडेचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उमरेड रोड परिसरात एका महिलेचा आणि तिच्या नातीचा मृतदेह पोलिसांना सापडला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून हे मृतदेह रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीचेच आहेत. नागपूर टुडे या वेब पोर्टलचे क्राइम रिपोर्टर रविकांत कांबळे यांची आई आणि मुलगी कालपासून बेपत्ता होत्या. त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघींचे अपहरण करुन त्यांची हत्या केली गेली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

उषा सेवकदास कांबळे असे रविकांत कांबळे यांच्या आईचे नाव आहे. राशी रविकांत कांबळे हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळपासून या दोघीही बेपत्ता होत्या. त्यानुसार रविकांत कांबळे यांनी पोलिसांत त्या दोघी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तसेच फेसबुकवरही रविवारी सकाळी या दोघींचा फोटो पोस्ट केला होता.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप

रविकांत कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलीस या दोघींचा शोध घेत होते. त्यांना उमरेड रोड परिसरातच गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आजी आणि नातीचा मृतदेह सापडला. या मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर हे दोन्ही मृतदेह उषा कांबळे आणि राशी कांबळे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

उषा सेवकदास कांबळे यांच्या अंगावरचे दागिने गायब झाले आहेत. तसेच त्यांच्याजवळचे पैसेही लंपास करण्यात आले आहेत. लुटीच्या उद्देशाने अपहरण करून या दोन हत्या करण्यात आल्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. मात्र या धक्कादायक घटनेमुळे नागपूर पुन्हा एकदा हादरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे गृहमंत्रीपदही स्वतःकडेच ठेवले आहे. मात्र गेल्या तीन वर्षातील नागपुरातील गुन्ह्यांचा आलेख पाहता चोरी, लूटमार, खून, बलात्कार, कैदी पळून जाणे यांसारख्या घटना वाढीला लागल्या आहेत. गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक उरलेला नाही अशीच तक्रार नागपूरकर वारंवार करत आहेत. अशा किती घटना घडल्यावर गृहखाते आणि पोलीस गुन्हेगारांना कठोर शासन करणार असा प्रश्न आता नागपूरकर विचारत आहेत.