कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला आहे. मागच्या अर्ध्यातासापासून मुंबई-रत्नागिरी-गोवा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लांजा जवळच्या वाकेड घाटात नाला खचला असून प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

नाला खचल्यामुळे लाल माती बाहेर आली असून ती हटवण्याचे काम सध्या सुरु आहे. कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवण्यात आली आहे.