कोल्हापुरातील पंचगंगा नदीत उडी मारून एक युवकाने आत्महत्या केली आहे. सत्यजित शिवाजी निकम असे मृत युवकाचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह सापडला नव्हता. गेल्या काही दिवसांपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी ओसंडून वाहत आहे. नदीने धोक्याची पातळीही ओलांडली आहे. आज (रविवार) दुपारच्या सुमारास सत्यजित निकम (वय २३, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) याने शिवाजी पुलावरून नदीत उडी मारली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत तो बुडाला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. सत्यजितने नदीत उडी का मारली हे अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक उपस्थित आहेत.