मध्य प्रदेशातील राजकीय अस्थितरतेवर भाष्य करताना महाराष्ट्रात आमच्यासारखे सर्जन बसलेत. मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. राज्यात जर असं कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. Sanjay Raut, Shiv Sena on political situation in Madhya Pradesh: BJP tried to form govt in Maharashtra too but failed. No such operation will be successful here. Surgeons like us are sitting here in operation theatre. If anyone comes to do it, he himself will be operated upon. pic.twitter.com/dtLM8VRnwG — ANI (@ANI) March 11, 2020 महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला.मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी. जय महाराष्ट्र — Sanjay Raut (@rautsanjay61) March 11, 2020 मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला असून काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिेंदे यांनी पक्षाला रामराम करीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मध्य प्रदेशचे कमलनाथ सरकार अस्थिर बनले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवेल का? या प्रश्नावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. "मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपाने ऑपरेशन लोटसचा प्रयोग करुन पाहिला मात्र ते यामध्ये यशस्वी झाले नाहीत. कारण इथं ऑपरेशन थिएटरमध्ये आमच्यासारखे सर्जन बसले आहेत. जर असं कोणी करु पाहत असेल तर हे ऑपरेशन त्याच्यावर उलटेल." असा टोला राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.