Maharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. सकल मराठा समाजाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात आला. मराठा आंदोलकांकडून मुंबईतही बंद पाळण्यात आला. पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये बंदला हिंसक वळण लागले. तर मुंबईत मराठा आंदोलकांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले. नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला गेला नाही. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही बंद ठेवण्यात आलं होती. दूध, शाळा-महाविद्यालये आणि वैद्यकीय सेवांना या बंदमधून वगळण्यात आले असून बंद सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल, असे जाहीर करण्यात आले. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चादरम्यान नवी मुंबई आणि ठाणे शहरात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे या दोन्ही शहरांत आज बंद पाळण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते.