दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, करोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

– मी सांगितल्याप्रमाणे पाडव्याला सर्व धर्मांची प्रार्थना स्थळी उघडली.

– कार्तिकी यात्रेला गर्दी करु नका.

– सर्व सण संयमाने साजरे केले.

– उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली.

– सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला करोनाचा आकडा खाली आला.

– सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका.

– दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे. परदेशात लॉकडाऊन करण्यात आला.

– गर्दी वाढली तरी करोना मरणार नाही, वाढणार आहे.

– ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना जास्त घातक आहे. तरुणांपासून वुद्धांना या आजाराची लागण होऊ शकते. त्यामुळे सर्वांनाच त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.

– लशीकरणाबाबत अजून सर्व अंधातरी आहे.

– २४ ते २५ कोटी जनतेला लशीकरण करायची गरज आहे.

– लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही,

– जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर ती जबाबदारी नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोल लगावला.

– अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा, ही मी कळकळीची विनंती करतो.

– लस येईल तेव्हा येईल, करोनापासून जेवढं शक्य होईल तेवढं लांब राहा.

– गर्दी टाळा, अनावश्यक ठिकाणी टाळा, मास्क लावण विसरु नका, हात धुवत रहा, योग्य अंतर पाळा हेच करोना टाळण्याचे उपाय आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.