मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये विदर्भ, शेतकऱ्यांसंदर्भात काही महत्वाच्या घोषणा केल्या. - महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार. - गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी योजना सुरु होणार. - मिहान प्रकल्पाला काहीही कमी पडू देणार नाही. - समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकार पैसा देणार. कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागत होते. महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार. - सिंचनाच्या कोणत्याही प्रकल्पाला स्थिगिती दिलेली नाही, स्थगिती देणार नाही. - यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसाठी २५३ कोटी रुपये देणार - कृषी समृद्धी केंद्रांमध्ये कृषी विकास प्रकल्पाची स्थापना करु. - समृद्धी महामार्गालगतच्या विकास प्रकल्पातून पाच लाख रोजगार निर्माण करणार. - आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद. - पूर्व विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्याची घोषणा.