राज्यात सध्या करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. आज दिवसभरात राज्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात १ हजार २७८ नव्या करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली. तर करोनामुळे एकूण ५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसभरात राज्यात १ हजार २७८ करोनाग्रस्तांची नोद झाली असून करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या २२ हजार १७१ वर पोहोचली आहे. तसंच दिवसभरात ३९९ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच आतापर्यंत ४ हजार १९९ रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. 1,278 new #COVID19 cases & 53 deaths reported in the state today. The total number of positive cases in the state rises to 22,171: Maharashtra Health Department pic.twitter.com/GrbJt85349 — ANI (@ANI) May 10, 2020 शनिवारी राज्यात १ हजार १६५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती. तसंच ३३० करोनाग्रस्तांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.